Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर जिल्ह्यात आज 1126 कोरोनामुक्त, 1016 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू






आतापर्यंत 64,944 जणांची कोरोनावर मात
 ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,725

चंद्रपूर, दि. 15 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1126 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1016 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 76 हजार 901 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 64 हजार 944 झाली आहे. सध्या 10 हजार 725 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 31 हजार 287 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 51 हजार 388 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

 आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 41व 73 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, बालाजी वार्ड येथील 74 व 82 वर्षीय पुरुष, भानापेठ वार्ड येथील 68 वर्षीय महिला, बाबुपेठ येथील 40 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, नगीनाबाग येथील 54 वर्षीय पुरुष, शक्तीनगर येथील 57 वर्षीय पुरुष, जलनगर येथील 75 वर्षीय महिला, दाताळा येथील 38 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील उज्वल नगर येथील 54 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड येथील 73 वर्षीय पुरुष. कोठारी येथील 68 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथील 70 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील मार्डा येथील 63 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील 65 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील वडगाव येथील 52 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1232 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1140 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 39, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 1016 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 250, चंद्रपूर तालुका 82, बल्लारपूर 66, भद्रावती 45, ब्रम्हपुरी 37, नागभिड 34, सिंदेवाही 39, मूल 119, सावली 53, पोंभूर्णा 16, गोंडपिपरी 28, राजूरा 58, चिमूर 11, वरोरा 85, कोरपना 73, जिवती 11 व इतर ठिकाणच्या 09 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies