तालुक्यातील एक युवक तृतीयपंथी असून कामानिमित्ताने तो बिहारमध्ये होता. बिहारवरून गोंडपिपरीत आल्यावर सरळ ग्रामीण रुग्णालय गाठून कोरोना टेस्ट करवून घेतली. काही वेळानंतर त्याला रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तुम्ही घरी जाऊ शकता, असे सांगण्यात आले. निश्चिंत मनाने तो घरी गेला. नंतर दोन-तीन दिवसांनी फोन करून तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्याला कळवण्यात आले.यावेळी मात्र संतापलेल्या त्या तृतीयपंथीने तडक ग्रामीण रुग्णालय गाठले. स्वतःच्या हक्काप्रति सजग असलेल्या त्या तृतीयपंथीने तेथील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अशा गलथान कारभारामुळे कोरोना पसरून लोकांचे जीव जात आहेत, असा गंभीर आरोपही त्याने केला. हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
आधी सांगितले निगेटिव्ह दिवसांनी सांगितले रिपोर्ट पॉझिटिव्ह
एप्रिल ३०, २०२१
0
Tags