चंद्रपूर – 3 सप्टेंबर पासून होणाऱ्या लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे, शासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे हा लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.
29 ऑगस्टला चंद्रपुरात 3 सप्टेंबर पासून लॉकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत होणारी वाढ बघता हा निर्णय करण्यात आला होता परंतु केंद्र व राज्य शासनाच्या नवीन गाईडलाईन्स मुळे लॉकडाऊन संदर्भातील निर्णयासंबंधी केंद्राकडून परवानगी आवश्यक असल्याने आम्ही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला परंतु अजूनही त्या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने हा लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने